Vasant More : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती

पुणे लोकसभेतून केली उमेदवारीची मागणी?


जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाने (Maratha Samaj) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मार्गदशनाखाली अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवाची बैठक बोलवण्यात आली होती. आज सकाळपासून ही बैठक सुरु आहे. संध्याकाळी बैठकीतील निर्णयाबाबत मनोज जरांगे माहिती देणार आहेत. दरम्यान, नुकतेच मनसे पक्षातून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या सभेला उपस्थिती दर्शवली. पुणे लोकसभेतून (Pune Loksabha) उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ही हजेरी लावली असल्याचे समजत आहे.


मराठा समाजाच्या आजच्या बैठकीत जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत असे कार्यकर्ते आपापल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले होते. राज्यातील ३६ लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्यांचे वाचन व अभ्यास त्यांनी केला. या बैठकीत निवडणूक लढवणे, उमेदवार उभे करणे, पुढील दिशा ठरवणे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुणे लोकसभा निवडणुकीकरता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.


मनोज जरांगे म्हणाले आहेत की, मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.



भेट झाली, पण चर्चा झाली नाही - वसंत मोरे


वसंत मोरे आजच्या भेटीसंदर्भात म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे, त्या करीता मी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आलो होतो. आज त्यांना पुण्याचा अहवाल समाज बांधवांनी दिला. आज मनोज जरांगे यांची भेट झाली, पण चर्चा झाली नाही. कागदावर त्यांना माहिती दिली आहे. तसेच काल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे.


मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे. आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे. जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील अशी अपेक्षा आहे. माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार आहे असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या