Vasant More : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती

  55

पुणे लोकसभेतून केली उमेदवारीची मागणी?


जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाने (Maratha Samaj) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मार्गदशनाखाली अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवाची बैठक बोलवण्यात आली होती. आज सकाळपासून ही बैठक सुरु आहे. संध्याकाळी बैठकीतील निर्णयाबाबत मनोज जरांगे माहिती देणार आहेत. दरम्यान, नुकतेच मनसे पक्षातून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या सभेला उपस्थिती दर्शवली. पुणे लोकसभेतून (Pune Loksabha) उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ही हजेरी लावली असल्याचे समजत आहे.


मराठा समाजाच्या आजच्या बैठकीत जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत असे कार्यकर्ते आपापल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले होते. राज्यातील ३६ लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्यांचे वाचन व अभ्यास त्यांनी केला. या बैठकीत निवडणूक लढवणे, उमेदवार उभे करणे, पुढील दिशा ठरवणे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुणे लोकसभा निवडणुकीकरता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.


मनोज जरांगे म्हणाले आहेत की, मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.



भेट झाली, पण चर्चा झाली नाही - वसंत मोरे


वसंत मोरे आजच्या भेटीसंदर्भात म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे, त्या करीता मी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आलो होतो. आज त्यांना पुण्याचा अहवाल समाज बांधवांनी दिला. आज मनोज जरांगे यांची भेट झाली, पण चर्चा झाली नाही. कागदावर त्यांना माहिती दिली आहे. तसेच काल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे.


मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे. आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे. जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील अशी अपेक्षा आहे. माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार आहे असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित