Loksabha Election: आचारसंहिता उल्लंघनाबाबत ७९ हजाराहून अधिक तक्रारींचा उलगडा

  138

भारतीय निवडणूक आयोगाकडे cVigil ॲपद्वारे तक्रारी दाखल



नवी दिल्ली : निवडणूकीचे वारे वाहू लागले असताना सर्व पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की, आचारसंहिता लावली जाते. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडे सीव्हीआयजीआयएल (cVigil) ॲपद्वारे ७९ हजार हून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. त्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.


भारत निर्वाचन आयोगाने सांगितल्याप्रमाणे बेकायदेशीर बॅनर होर्डिंगबाबत ५८,५०० तक्रारी, पैसे, भेटवस्तू आणि दारूच्या वितरणाबाबत १,४०० तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तीन टक्के तक्रारी मालमत्तेच्या नुकसानीच्या होत्या. गुंडगिरीच्या ५३५ तक्रारींपैकी ५२९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निषिद्ध कालावधी नंतरच्या प्रचारा संबंधित एक हजार तक्रारी दाखल होत्या. बंदुकांचे प्रदर्शन आणि धमकावण्याबाबत ५३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ५२९ तक्रारींचे निराकरण केले आहे. शिवाय, १००० तक्रारी निषिद्ध कालावधीच्या पलीकडे प्रचारासाठी करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ स्पीकर्स वापरल्याचा समावेश असल्याचे आयोगाने सांगितले.


सीव्हीआयजीआयएल (cVIGIL) हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्यावर नागरिकांना राजकीय गैरवर्तन घटनांच्या तक्रारी करता येतात. मतदान पॅनेलने म्हटले आहे की सीव्हीआयजीआयएल (cVIGIL) एक प्रभावी साधन बनले आहे आणि निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...

आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन

चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि

महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

९ महिला सरपंचांचा समावेश नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी

Minta Devi: काँग्रेसची पोलखोल! बिहारमधील '१२४ वर्षीय' मिंटा देवी कॅमेऱ्यासमोर आल्या, काय म्हणाल्या पहा...

बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या