AI : भारतातील लहान मुलं 'आई' बोलताच 'एआय'ही बोलायला शिकतात!

बिल गेटस यांच्यासमवेत आधुनिक तंत्रज्ञानावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स (Bill Gates) यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी आजच्या काळात एआयच्या (Artificial Intelligence) वापराबद्दल भरपूर गप्पा मारल्या. भारतातील मुलं बोलायला लागताच 'एआय' (AI) म्हणतात, असंही मोदी मिश्किलपणे म्हणाले.


"भारतातील कित्येक भाषांमध्ये जन्मदात्रीला 'आई' म्हटलं जातं. लहान मुलांचा पहिला शब्द बहुतांश वेळा आई हाच असतो. मात्र आजकालच्या मुलांचा पहिला शब्द 'एआई' ठरत आहे.. हा केवळ विनोद आहे. मात्र, खरंच आई आणि एआय हे ऐकायला एकसारखंच वाटतं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



सामान्यांपर्यंत पोहोचलं एआय


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देखील आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पोहोचलं आहे. "G20 शिखर परिषदेवेळी मी भाषांतरासाठी एआयचा वापर केला. यावेळी माझ्या सर्व चालकांनी एआय अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते, ज्या माध्यमातून ते विविध देशांमधून आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांशी संवाद साधू शकत होते." असं त्यांनी सांगितलं.





एआयचा गैरवापर टाळणं गरजेचं


यावेळी पंतप्रधानांनी एआयच्या गैरवापराबद्दल चिंताही व्यक्त केली. ते म्हणाले की योग्य प्रशिक्षण न देता एखाद्या व्यक्तीच्या हातात एआय दिल्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. एआय-जनरेटेड कंटेंटवर क्लिअर वॉटरमार्क देणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्यांनाही तो कंटेंट एआय जनरेटेड आहे हे समजेल आणि त्याचा गैरवापर टळेल. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे असा कंटेंट ओळखता येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर