AI : भारतातील लहान मुलं 'आई' बोलताच 'एआय'ही बोलायला शिकतात!

  59

बिल गेटस यांच्यासमवेत आधुनिक तंत्रज्ञानावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स (Bill Gates) यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी आजच्या काळात एआयच्या (Artificial Intelligence) वापराबद्दल भरपूर गप्पा मारल्या. भारतातील मुलं बोलायला लागताच 'एआय' (AI) म्हणतात, असंही मोदी मिश्किलपणे म्हणाले.


"भारतातील कित्येक भाषांमध्ये जन्मदात्रीला 'आई' म्हटलं जातं. लहान मुलांचा पहिला शब्द बहुतांश वेळा आई हाच असतो. मात्र आजकालच्या मुलांचा पहिला शब्द 'एआई' ठरत आहे.. हा केवळ विनोद आहे. मात्र, खरंच आई आणि एआय हे ऐकायला एकसारखंच वाटतं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



सामान्यांपर्यंत पोहोचलं एआय


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देखील आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पोहोचलं आहे. "G20 शिखर परिषदेवेळी मी भाषांतरासाठी एआयचा वापर केला. यावेळी माझ्या सर्व चालकांनी एआय अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते, ज्या माध्यमातून ते विविध देशांमधून आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांशी संवाद साधू शकत होते." असं त्यांनी सांगितलं.





एआयचा गैरवापर टाळणं गरजेचं


यावेळी पंतप्रधानांनी एआयच्या गैरवापराबद्दल चिंताही व्यक्त केली. ते म्हणाले की योग्य प्रशिक्षण न देता एखाद्या व्यक्तीच्या हातात एआय दिल्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. एआय-जनरेटेड कंटेंटवर क्लिअर वॉटरमार्क देणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्यांनाही तो कंटेंट एआय जनरेटेड आहे हे समजेल आणि त्याचा गैरवापर टळेल. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे असा कंटेंट ओळखता येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे