Indian Judiciary : विशिष्ट समूहातील लोक न्यायसंस्थेवर टाकतायत दबाव

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह ६०० न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र


नवी दिल्ली : देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत (Indian Judiciary) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करणारे पत्र देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्याकडे सोपवले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) आणि इतर ६०० वकिलांनी अशा प्रकारे न्यायव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.


मागच्या काही काळात विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वपूर्ण निकाल दिले त्यातील अनेक निकाल हे राजकारणाशी निगडित होते. वकिलांनी या पत्रात म्हटले की, “राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेतुपुरस्सर न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. त्यामुळे न्यायाव्यवस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य असलेले विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे”, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली.


सरन्यायाधीश यांना लिहिल्या गेलेल्या पत्रावर देशभरातील ६०० वकिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, “विशिष्ट लोकांचा गट विविध मार्गांनी कार्यरत असून तो न्यायालयाचा भूतकाळ हा सुवर्ण काळ असल्याची खोटी माहिती प्रसारित करत आहे. यातून वर्तमानातील घडामोडींबद्दल विरोधाभास निर्माण केला जात आहे. न्यायालयीन कामकाज, निकाल यावर प्रभाव टाकणे आणि न्यायालयांवर नैतिक दबाव निर्माण करून राजकीय लाभ उचलण्यासाठी हेतुपुरस्सरपणे अशा गोष्टी केल्या जात आहेत.”


वकिलांनी आपल्या पत्रात आरोप केला की, आपली न्यायव्यवस्था अन्याय करण्यात गुंतली असल्याचा आरोप करण्यासाठी हे विशिष्ट गटाचे लोक आपल्या न्यायालयांची तुलना अशा देशांशी करत आहेत, त्या देशांत कायद्याचे राज्य नाही. आम्हाला वाटतं ही केवळ टीका नाही, तर हा थेट न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. ज्याचा उद्देश सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी करणे आणि कायद्याच्या प्रक्रियेला धोका निर्माण करणे, असा आहे.


सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, उज्वला पवार, उदय होल्ला आणि स्वरुपमा चतुर्वैदी यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

Chhattisgarh Plane crashes : डोंगराला धडकून विमानाचा अपघात; वैमानिकांचा मृत्यू

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील

India - South Korea Relations : चिप्सपासून जहाजांपर्यंत, भारत-कोरिया मिळून नवीन संधी साकार करतील: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) अद्ययावत करण्यासाठी चर्चा सुरू

Plane crash : छत्तीसगडच्या डोंगराळ भागात कोसळले खासगी विमान

जशपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात आरा पर्वतरांगेत खासगी विमान कोसळले. कोसळलेले चार्टर्ड प्लेन जशपूर

Pachpadra Refinery Fire : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या आधीच पाचपद्रा रिफायनरीत भीषण आग; कार्यक्रमावर अनिश्चितता

राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी

Ajanta Caves : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओन पो शेरिंग यांनी दिली भेट

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीचे उद्घाटन करणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राजस्थानचा दौरा करणार असून, बालोत्रा येथील पाचपद्रा येथे देशातील पहिले