Indian Judiciary : विशिष्ट समूहातील लोक न्यायसंस्थेवर टाकतायत दबाव

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह ६०० न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र


नवी दिल्ली : देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत (Indian Judiciary) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करणारे पत्र देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्याकडे सोपवले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) आणि इतर ६०० वकिलांनी अशा प्रकारे न्यायव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.


मागच्या काही काळात विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वपूर्ण निकाल दिले त्यातील अनेक निकाल हे राजकारणाशी निगडित होते. वकिलांनी या पत्रात म्हटले की, “राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेतुपुरस्सर न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. त्यामुळे न्यायाव्यवस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य असलेले विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे”, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली.


सरन्यायाधीश यांना लिहिल्या गेलेल्या पत्रावर देशभरातील ६०० वकिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, “विशिष्ट लोकांचा गट विविध मार्गांनी कार्यरत असून तो न्यायालयाचा भूतकाळ हा सुवर्ण काळ असल्याची खोटी माहिती प्रसारित करत आहे. यातून वर्तमानातील घडामोडींबद्दल विरोधाभास निर्माण केला जात आहे. न्यायालयीन कामकाज, निकाल यावर प्रभाव टाकणे आणि न्यायालयांवर नैतिक दबाव निर्माण करून राजकीय लाभ उचलण्यासाठी हेतुपुरस्सरपणे अशा गोष्टी केल्या जात आहेत.”


वकिलांनी आपल्या पत्रात आरोप केला की, आपली न्यायव्यवस्था अन्याय करण्यात गुंतली असल्याचा आरोप करण्यासाठी हे विशिष्ट गटाचे लोक आपल्या न्यायालयांची तुलना अशा देशांशी करत आहेत, त्या देशांत कायद्याचे राज्य नाही. आम्हाला वाटतं ही केवळ टीका नाही, तर हा थेट न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. ज्याचा उद्देश सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी करणे आणि कायद्याच्या प्रक्रियेला धोका निर्माण करणे, असा आहे.


सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, उज्वला पवार, उदय होल्ला आणि स्वरुपमा चतुर्वैदी यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या दिल्लीच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असून,

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Ashish Shelar : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आशिष शेलारांची तत्पर साथ; खात्यांतर्गत घेतले ३ मोठे निर्णय!

मुंबई : मध्य पूर्वेमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यामध्ये मोठे अडथळे

Chandranath Rath Death : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येचा उलगडा; ३ आरोपी जेरबंद, एका 'UPI' पेमेंटमुळे लागला छडा!

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendhu Adhikari) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (Chandranath Rath)

National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना

India–Pakistan border High-Alert : श्रीगंगानगरमध्ये हाय-अलर्ट वाढवला; सीमाभागात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक निर्बंध लागू

राजस्थान : राजस्थानमधील श्रीगंगानगर (Sri Ganganagar) येथे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट कायम ठेवला असून भारत - पाकिस्तान