Arvind Kejriwal : हायकोर्टाकडून दिलासा मिळाला तरी केजरीवालांच्या समस्या संपेनात!

  58

आणखी सात दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी


नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) फेटाळली असली तरी त्यांना आणखी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने (ED) कोर्टात केली आहे.


केजरीवाल यांच्या आधीच्या ईडी कोठडीची मुदत गुरुवारी संपली आहे. त्यानंतर कोठडीची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी ईडीने केली आहे. गुरुवारी केजरीवालांच्या कोठडीवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली.


दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती काल समोर आली होती. ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी