Arvind Kejriwal : हायकोर्टाकडून दिलासा मिळाला तरी केजरीवालांच्या समस्या संपेनात!

  53

आणखी सात दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी


नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) फेटाळली असली तरी त्यांना आणखी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने (ED) कोर्टात केली आहे.


केजरीवाल यांच्या आधीच्या ईडी कोठडीची मुदत गुरुवारी संपली आहे. त्यानंतर कोठडीची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी ईडीने केली आहे. गुरुवारी केजरीवालांच्या कोठडीवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली.


दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती काल समोर आली होती. ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.