Nitesh Rane : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचाय!

आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मविआमध्ये (MVA) जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसला (Congress) विचारात न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. त्यातच ठाकरे गटाने (Thackeray Group) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नव्या यादीमध्ये मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे समोर आले. त्यामुळे काँग्रेसला वगळण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा डाव आहे, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काल मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसला सोबत न घेता निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला, ही आम्हाला मिळालेली माहिती आज तंतोतंत खरी ठरली. आज आलेल्या उबाठाच्या यादीने यावर शिक्कामोर्तबच केलं.


उबाठा आणि शरद पवारांना काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचाय. अशी टीका नितेश राणे यांनी केली. ते म्हणाले, मुंबईतल्या सहापैकी चार जागा जर उबाठाच लढवणार असेल, तर काँग्रेसच्या हाती काय लागणार? बाबाजी का ठुल्लु? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.



बंटी आणि बबली तुमचे कसे होणार?


काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींना हे कळलं पाहिजे की जो उद्धव ठाकरे स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, जो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो संजय राजाराम राऊत स्वतःच्या घरच्यांचा झाला नाही, तर हे बंटी आणि बबली तुमचे कसे होणार? याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजच विचार करावा, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या