Nitesh Rane : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचाय!

आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मविआमध्ये (MVA) जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसला (Congress) विचारात न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. त्यातच ठाकरे गटाने (Thackeray Group) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नव्या यादीमध्ये मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे समोर आले. त्यामुळे काँग्रेसला वगळण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा डाव आहे, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काल मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसला सोबत न घेता निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला, ही आम्हाला मिळालेली माहिती आज तंतोतंत खरी ठरली. आज आलेल्या उबाठाच्या यादीने यावर शिक्कामोर्तबच केलं.


उबाठा आणि शरद पवारांना काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचाय. अशी टीका नितेश राणे यांनी केली. ते म्हणाले, मुंबईतल्या सहापैकी चार जागा जर उबाठाच लढवणार असेल, तर काँग्रेसच्या हाती काय लागणार? बाबाजी का ठुल्लु? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.



बंटी आणि बबली तुमचे कसे होणार?


काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींना हे कळलं पाहिजे की जो उद्धव ठाकरे स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, जो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो संजय राजाराम राऊत स्वतःच्या घरच्यांचा झाला नाही, तर हे बंटी आणि बबली तुमचे कसे होणार? याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजच विचार करावा, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती