Pankaja Munde : ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं!

गाडीवर हल्ला करणारे लोक मनोज जरांगेंच्या आंदोलनातील? पंकजा मुंडे थेट म्हणाल्या...


बीड : भाजपाकडून (BJP) बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Loksabha constituency) उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीडमध्ये प्रचार करत असताना काही मराठा आंदोलकांनी (Maratha protesters) त्यांची गाडी अडवली. तसेच त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले, यासह ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला केला. यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रचारावेळी झालेल्या या गोंधळाबाबत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. गोंधळ घालणारे आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाशी संबंधित नसावेत, ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणारे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल काढून दाखवले. आसपासच्या गावात इतर नेत्यांनाही अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. हे तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवतायत. केवळ मलाच नाही तर इतर नेत्यांनाही काळे झेंडे दाखवत आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे की, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. परंतु, काहींनी तिथे गोंधळ घातला, आरडाओरड सुरू केली. मला असं वाटतं की, ते रुमाल दाखवणारे चार-पाच लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील असावेत. परंतु, बाकीचे जे गोंधळ घालणारे लोक होते ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील नसावेत. मला वाटतं ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं.


मराठा आंदोलक तुम्हाला विरोध का करत आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ते केवळ मलाच थोडी विरोध करतायत? इतरांनाही त्यांचा विरोध चालू आहे. तिथे इतर नेत्यांना मराठा आंदोलकांनी जाऊ दिलं का ते तपासा. ते समाजातील सर्वच नेत्यांचा विरोध करत आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागत आहे. मलाच विरोध होतोय अशातला काही भाग नाही. केवळ मलाच विरोध होत असेल तर ते विरोधकांकडून जाणीवपूर्वक चालू असेल.


पंकजा मुंडे म्हणाल्या, मला केवळ इतकंच वाटतं, की हे आंदोलन करत असताना कोणाचाही अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. परंतु, मला खात्री आहे की, ती माणसं जरांगे पाटलांची नाहीत, असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना