Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, सुनावणी ३ एप्रिलला

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतची वेळ दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.


या प्रकरणाची सुनावणी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडीने तब्बल २ तास चौकशी केल्यानंतर त्याच्या अधिकृत निवासस्थानावरून अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.


ईडीकडून अटक आणि कस्टडीला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयाने नोटीस जारी करत ईडीकडून उत्तर मागितले आहे. ईडीला २ एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचे आहे. न्यायलयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.


केजरीवाल यांच्या वकिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्री यांची तात्काळ सुटका आणि प्रकरणात तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. दरम्यान, ईडीने तत्काळ सुनावणीला विरोध केला होता आणि केजरीवाल यांचे अॅप्लिकेशन आणि रिट याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती. उच्च न्यायालयाने बुधवारी ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतचा वेळ दिला आहे आणि प्रकरणाची सुनावणी ३ एप्रिलला होत आहे.



कोर्टाने म्हटले ईडीचे उत्तर गरजेचे


कोणत्याही प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय देताना न्यायालयाचे नैसर्गिक सिद्धांत लक्षात घेता दोन्ही पक्षांना निष्पक्षपणे ऐकणे गरजेचे असते. सध्याच्या प्रकरणात ईडीचे उत्तर आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ