Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, सुनावणी ३ एप्रिलला

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतची वेळ दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.


या प्रकरणाची सुनावणी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडीने तब्बल २ तास चौकशी केल्यानंतर त्याच्या अधिकृत निवासस्थानावरून अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.


ईडीकडून अटक आणि कस्टडीला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयाने नोटीस जारी करत ईडीकडून उत्तर मागितले आहे. ईडीला २ एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचे आहे. न्यायलयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.


केजरीवाल यांच्या वकिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्री यांची तात्काळ सुटका आणि प्रकरणात तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. दरम्यान, ईडीने तत्काळ सुनावणीला विरोध केला होता आणि केजरीवाल यांचे अॅप्लिकेशन आणि रिट याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती. उच्च न्यायालयाने बुधवारी ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतचा वेळ दिला आहे आणि प्रकरणाची सुनावणी ३ एप्रिलला होत आहे.



कोर्टाने म्हटले ईडीचे उत्तर गरजेचे


कोणत्याही प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय देताना न्यायालयाचे नैसर्गिक सिद्धांत लक्षात घेता दोन्ही पक्षांना निष्पक्षपणे ऐकणे गरजेचे असते. सध्याच्या प्रकरणात ईडीचे उत्तर आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना