निवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटेंनी दिला नोकरीचा राजीनामा...

  306

बीडमध्ये मुंडे-मेटे रंगणार लोकसभेचा सामना


मुंबई/बीड (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने ही लढाई रंगतदार होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभही केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंविरुद्ध कोण, असा प्रश्न असतानाच आता ज्योती मेटेंनी निवडणूक लढण्याची घोषणाच केली आहे.


महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे. बीड लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतला आहे. दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशीही शरद पवारांनी तब्बल दीड तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी बाग इथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेना तगडे आव्हान बीडमधून देण्यात येणार असल्याचे दिसून येते.


शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे. त्यातच, ज्योती मेटेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे म्ह्टले आहे. शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योती मेटेंनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष, ह्याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती