पंजाब काँग्रेसला मोठा झटका, लुधियानामधून खासदार रवनीत सिंह बिट्टूंनी पकडला भाजपचा हात

  64

नवी दिल्ली: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीआधी(loksabha election 2024) काँग्रेसला(congress) मोठा झटका बसला आहे. लुधियाना येथून खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी भाजपचा हात धरला आहे. रवनीत हे दिवंगत माजी सीएम बेअंत सिंह यांचे नातू आहेत. त्यांना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.


दिल्लीस्थित भाजपच्या मुख्यालयात रवनीत सिंह बिट्टूने पक्षाचे सदस्यत्व घेतले. नुकतेच दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निशाण बनवले होते.


रवनीत सिंहने आपल्या एक्स पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी लिहिले होते की केजरीवाल अँड पीर्टी स्वराज आणि जनलोकपालचे वचन देत सत्तेत आले होते. मात्र ही विडंबना झाली. दिल्लीत भ्रष्टाचारचे हे प्रकरण म्हणजे केवळ सुरूवात आहे.



तीन वेळचे खासदार आहेत रवनीत सिंह बिट्टू


रवनीत सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास ते तीन वेळा खासदार झाले. २०१४ आणि २०१९मध्ये ते लुधियाना येथून निवडून आले होते. तर २००९मध्ये काँग्रेसने त्यांना आनंदपूर साहिब येथून तिकीट दिले होते. तेथेही त्यांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

भारताच्या हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्राच्या चाचण्या प्रगतीपथावर

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारतीय सैन्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची पाकिस्तान विरोधात यशस्वी

Air India Plane Crash : विमानाच्या उड्डाणमार्गातील अडथळे हटवण्यासाठी केंद्राची नवीन नियमावली!

विमानतळांच्या जवळचे अडथळे होणार दूर नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर एका

अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जूनला लाँच होणार नाही, लवकरच होणार नव्या तारखेची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

अहमदाबाद: एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 या अहमदाबाद - लंडन विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा

Air India To Cut Flights : विमान अपघातानंतर एअर इंडियाने १५% आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली कमी!

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर आणि इराण-इस्रायल संघर्ष सुरू असल्याने, एअर