पंजाब काँग्रेसला मोठा झटका, लुधियानामधून खासदार रवनीत सिंह बिट्टूंनी पकडला भाजपचा हात

नवी दिल्ली: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीआधी(loksabha election 2024) काँग्रेसला(congress) मोठा झटका बसला आहे. लुधियाना येथून खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी भाजपचा हात धरला आहे. रवनीत हे दिवंगत माजी सीएम बेअंत सिंह यांचे नातू आहेत. त्यांना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.


दिल्लीस्थित भाजपच्या मुख्यालयात रवनीत सिंह बिट्टूने पक्षाचे सदस्यत्व घेतले. नुकतेच दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निशाण बनवले होते.


रवनीत सिंहने आपल्या एक्स पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी लिहिले होते की केजरीवाल अँड पीर्टी स्वराज आणि जनलोकपालचे वचन देत सत्तेत आले होते. मात्र ही विडंबना झाली. दिल्लीत भ्रष्टाचारचे हे प्रकरण म्हणजे केवळ सुरूवात आहे.



तीन वेळचे खासदार आहेत रवनीत सिंह बिट्टू


रवनीत सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास ते तीन वेळा खासदार झाले. २०१४ आणि २०१९मध्ये ते लुधियाना येथून निवडून आले होते. तर २००९मध्ये काँग्रेसने त्यांना आनंदपूर साहिब येथून तिकीट दिले होते. तेथेही त्यांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात