आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईला

नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बोर्डाने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.


आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. २१ सामन्यांचे ७ एप्रिलपर्यंतचे हे वेळापत्रक होते. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आयपीएलची यंदाच्या हंगामाची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.


सोमवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. २६ मे २०२४ रोजी आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलची फायनल चेन्नईत होणार आहे.


क्वालिफायर १ आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे २१ मे आणि २२ मे रोजी होणार आहेत. तर क्वालिफायर दोन हा सामना २४ मे रोजी चेन्नईला होणार आहे.

Comments
Add Comment

फुटबॉल, फॅसिझम आणि वाद : विश्वचषकाचा रंजक इतिहास!

फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही; तो जगभरातील अब्जावधी लोकांच्या भावना, राष्ट्रीय अस्मिता आणि संस्कृतीचा महोत्सव आहे.

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि