Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या कस्टडीमधून चालवत आहेत सरकार

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यांनी रविवारी सकाळी तुरूंगातून पहिला आदेश जारी केला. त्यांचा हा आदेश दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश अटकेच्या तीन दिवसांनी जारी केला आहे. तर त्यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन दिल्लीसह विविध शहरांमध्ये सुरू आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक नोटच्या माध्यमातून जल मंत्र्यांना आपले आदेश जारी केले. दिल्ली सरकारमध्ये जल मंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स करू शकते.



जामीनाचे हकदार


दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तत्काळ सुनावणीवर नकार दिला. न्यायालय त्यांच्या याचिकेवर २७ मार्च २०२४ला सुनावणी करेल. आपल्या या याचिकेत त्यांनी ईडीकडून स्वत:ला केलेली अटक आणि ट्रायल कोर्टाचे आदेश चुकीचे असल्याचे म्हटले आहे.



सीएम जेलमधून चालवणार सरकार


आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचलनालयाने २१ मार्च तथाकथित दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. ईडीने सीएमला अटक केल्यानंर दुसऱ्याच दिवशी राऊज एव्हेन्यू कोर्टात सादर केले. न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.





Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी