Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या कस्टडीमधून चालवत आहेत सरकार

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यांनी रविवारी सकाळी तुरूंगातून पहिला आदेश जारी केला. त्यांचा हा आदेश दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश अटकेच्या तीन दिवसांनी जारी केला आहे. तर त्यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन दिल्लीसह विविध शहरांमध्ये सुरू आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक नोटच्या माध्यमातून जल मंत्र्यांना आपले आदेश जारी केले. दिल्ली सरकारमध्ये जल मंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स करू शकते.



जामीनाचे हकदार


दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तत्काळ सुनावणीवर नकार दिला. न्यायालय त्यांच्या याचिकेवर २७ मार्च २०२४ला सुनावणी करेल. आपल्या या याचिकेत त्यांनी ईडीकडून स्वत:ला केलेली अटक आणि ट्रायल कोर्टाचे आदेश चुकीचे असल्याचे म्हटले आहे.



सीएम जेलमधून चालवणार सरकार


आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचलनालयाने २१ मार्च तथाकथित दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. ईडीने सीएमला अटक केल्यानंर दुसऱ्याच दिवशी राऊज एव्हेन्यू कोर्टात सादर केले. न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.





Comments
Add Comment

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील

‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८

मोंथा चक्रीवादळ: आज रात्री आंध्र प्रदेशावर धडकणार! ओडिशा आणि तामिळनाडूमध्येही धोक्याचा इशारा

काकीनाडा: बंगालच्या उपसागरातून आलेले 'मोंथा' (Montha) चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून, ते आज मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी