Prakash Ambedkar : मविआशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धरला 'हा' नवा मार्ग

लोकसभेसाठी वंचित कोणासोबत करणार युती?


मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे या गोष्टीला आणखी पुष्टी मिळाली. 'आमचा चार जागांचा प्रस्ताव वंचितने मान्य केला असता तर नक्की आनंद झाला असता', असं संजय राऊत म्हणाले. युतीबाबत भूतकाळ वापरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत होऊ घातलेली युती फिस्कटल्याचे सर्वांच्या लक्षात आले.


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला (Congress) पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर मविआचा हात पूर्णपणे सोडून वेगळ्या वाटेवर चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचं कारण म्हणजे वंचितने बीएसआर (BRS) पक्षासोबत युतीच्या चर्चा सुरु केल्या आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.


महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिस्कटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं. त्यामुळे आता भविष्यात बीसीआर-वंचित आघाडीची युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त