माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते

  73


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की, त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वानाचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, “खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू?”



दुसरा रोग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत् आपले आहे. मात्र, आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजन-पूजन चालू आहे; परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलटपक्षी, भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले. बायको, मुले, नोकरी-धंदा, घरदार इ. कितीतरी गोष्टी, की ज्यांपासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते, त्या गोष्टी पुरविल्या; पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून, कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार?



आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण, वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती ! असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची ! उलट आजची स्थिती पाहावी तर ‘सुधारणा’ जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे.



परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही.



आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार; परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ ‘समजून’ जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. ‘मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे’, असे वाटणे जरूर आहे.



तात्पर्य : ज्याची हाव, म्हणजे वासना, पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही.


Comments
Add Comment

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची