IPL 2024 : मराठमोळा ऋतुराज गायकवाड सांभाळणार CSKचे कर्णधारपद!

महेंद्रसिंग धोनीने दिली जबाबदारी


मुंबई : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये (Cricket lovers) आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) अचानक कर्णधारपद सोडले असून ही जबाबदारी त्याने मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) खांद्यावर सोपवली आहे. धोनीने गेल्या मोसमात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.


आयपीएलने आज सर्व कर्णधार (Captains) आणि ट्रॉफीसह फोटो एक्सवर शेअर केला. या फोटोत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली. 'टाटा आयपीएल सुरू होत आहे. आम्ही रॉक अँड रोलसाठी सज्ज झालो आहोत. सादर करत आहोत ९ कर्णधार. पंजाब किंग्जचा उपकर्णधार जितेश शर्मा संघाचं फोटोसाठी प्रतिनिधित्व करत आहे', असं आयपीएलने या फोटोला कॅप्शन दिलं आहे.


उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १७व्या हंगामाचा पहिला सामना सीएसकेचा आरसीबीविरुद्ध होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या मोसमात अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावेळेस ऋतुराज ही जबाबदारी कशी निभावणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





याआधीही धोनीने सोडले होते कर्णधारपद


धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयपीएल २०२२ मध्ये संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली.


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने