अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; ईडीचे पथक धडकले केजरीवाल यांच्या घरी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे. उच्च न्यायालयात या प्रलंबित याचिकेसह या याचिकेवरही २२ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात लंच ब्रेकनंतर सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला सांगितले की कोणत्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. ईडीने न्यायालयाला आग्रह केला होता की तथ्ये केवळ न्यायालयाने पाहावीत. अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांना दाखवू नये. ईडीकडून सांगण्यात आले की हे कोणतीही निवडणूक लढवत नाहीत. ते विपश्यनेला कधीही जातात मात्र ईडीकडे जात नाहीत. कोर्टाने ईडीला म्हटले की तुम्ही इतके समन्स पाठवले आहेत तर सरळ अटक का करत नाहीत.

ईडीने म्हटले की आम्हाला त्यांची बाजू जाणून घ्यायची आहे. त्यांनी आमच्यासमोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

ईडीचे पथक धडकले केजरीवाल यांच्या घरी


दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचे पथक आज गुरुवारी संध्याकाळी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. केजरीवाल आज ईडीच्या ९ व्या समन्सवर हजर झालेले नव्हते. त्यानंतर ईडीची तपास यंत्रणा थेट केजरीवाल यांच्या घरी धडकली आहे.
Comments
Add Comment

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो