प्रहार    

हिंगोलीमध्ये भूकंपाचे झटके, १० मिनिटांत दोनदा बसले मोठे धक्के

  130

हिंगोलीमध्ये भूकंपाचे झटके, १० मिनिटांत दोनदा बसले मोठे धक्के

हिंगोली: राज्यातील हिंगोली जिल्ह्यात गुरूवारी एकामागोमाग एक असे भूकंपाचे दोन जोरदार झटके बसले. हे झटके १० मिनिटांच्या अंतरांनी बसले.


हिंगोलीत सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याती तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. तर सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती.


भूकंपाच्या धक्क्यांनी तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकामागोमाग बसलेल्या दोन झटक्यामुळे तेथील लोक तातडीने घराच्या बाहेर आले.



अरूणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के


देशातील पूर्वोत्तर राज्य अरूणाचलमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही.



कसा येतो भूकंप?


भूकंप कसा येतो हे समजण्यासाठी आपल्या वैज्ञानिक पद्धतीने आधी पृ्थ्वीची संरचना जाणून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर आहे. त्याच्याखाली तरल पदार्थ आहे आणि त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. अनेकदा या प्लेट्स एकमेकांना आदळतात. सातत्याने या प्लेट्स आदळल्याने त्यांचे कोपरे दुमडले जातात आणि दबाव पडल्याने या प्लेट्स तुटू लागतात. अशातच या प्लेट्सच्या खालून निघालेली उर्जा बाहेरच्या दिशेने निघण्याचा प्रयत्न करते. मात्र जेव्हा यात अडथळा येतो त्यानंतर भूकंप येतात.

Comments
Add Comment

पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या डोळ्याला ‘काचबिंदू’

शहरातील ४ हजार ८०० पैकी तब्बल तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पिंपरी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे

‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ

खेड येथील अपघाताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

मुंबई: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप

मराठ्यांचा अभिमान उजळला! रघुजींचा वारसा सरकारच्या हाती

मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे