हिंगोलीमध्ये भूकंपाचे झटके, १० मिनिटांत दोनदा बसले मोठे धक्के

हिंगोली: राज्यातील हिंगोली जिल्ह्यात गुरूवारी एकामागोमाग एक असे भूकंपाचे दोन जोरदार झटके बसले. हे झटके १० मिनिटांच्या अंतरांनी बसले.


हिंगोलीत सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याती तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. तर सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती.


भूकंपाच्या धक्क्यांनी तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकामागोमाग बसलेल्या दोन झटक्यामुळे तेथील लोक तातडीने घराच्या बाहेर आले.



अरूणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के


देशातील पूर्वोत्तर राज्य अरूणाचलमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही.



कसा येतो भूकंप?


भूकंप कसा येतो हे समजण्यासाठी आपल्या वैज्ञानिक पद्धतीने आधी पृ्थ्वीची संरचना जाणून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर आहे. त्याच्याखाली तरल पदार्थ आहे आणि त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. अनेकदा या प्लेट्स एकमेकांना आदळतात. सातत्याने या प्लेट्स आदळल्याने त्यांचे कोपरे दुमडले जातात आणि दबाव पडल्याने या प्लेट्स तुटू लागतात. अशातच या प्लेट्सच्या खालून निघालेली उर्जा बाहेरच्या दिशेने निघण्याचा प्रयत्न करते. मात्र जेव्हा यात अडथळा येतो त्यानंतर भूकंप येतात.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात