सासू-सासऱ्यांच्या मानसिक शांततेसाठी सुनेला घराबाहेर काढता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

  78

मुंबई: वयस्कर सासू-सासऱ्यांना मानसिक शांतता मिळावी यासाठी सुनेला घराबाहेर काढता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संदीप माऱणे यांच्या पीठाने एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला.


महिलेने दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला होता की पतीने आपल्या आई-वडिलांशी मिळून तिला घराबाहेर काढण्यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनलचा दुरूपयोग केला आहे. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की वरिष्ठ नागरिकांना शांततेने जगण्याचा हक्क आहे मात्र त्याचवेळी त्यांच्या रक्षणासाठी केलेल्या कायद्यांचा वापर करताना घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यातील तरतुदींची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.


याचिका करणारी महिला आणि तिचे पती यांचे १९९७मध्ये लग्न झाले होते. ते सासऱ्यांच्या नावावर असलेल्या घरात राहत होते. पती-पत्नी यांच्यात काही वैवाहिक वाद होते. यातच मेंटेनन्स ट्रिब्युनलने २०२३मध्ये आदेश देताना फ्लॅट खाली करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान याचिकाकर्तीच्या पतीने घर खाली केले नाही आणि मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या आदेशाला आवाहनही दिले नाही. ते आपल्या आई-वडिलांसोबतच राहत होते. यावरून न्यायालयाला समजले की महिलेच्या सासरच्यांनी केलेली ही कारवाई केवळ तिला घराबाहेर काढण्याच्या हेतूने होती.


त्यामुळे यावेळी कोर्टाने स्पष्ट केले की, तिच्याकडे राहण्यासाठी इतर कोणतीही जागा नाही. यासाठी वरिष्ठ नागरिकांच्या मानसिक शांततेसाठी तिला बेघर केले जाऊ शकत नाही.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता