Delhi building collapsed : दिल्लीत मध्यरात्री इमारत कोसळली! दोन मजुरांचा चिरडून मृत्यू

एक मजूर गंभीर जखमी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) काल मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. ईशान्य दिल्लीतील वेलकम भागातील कबीर नगरमध्ये बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली (Building collapsed). या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २:१६ च्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काम सुरू होते. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही, नंतर त्यांना एक घर कोसळल्याचे समजले. अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले.


ढिगाऱ्याखाली तीन मजूर गाडले गेले. तिघांनाही बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जीटीबी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तिसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहीद असे इमारतीच्या मालकाचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुढील तपास सुरू आहे.


कबीर नगर येथील घर कोसळण्याच्या घटनेतील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात अर्शद, वय ३० वर्षे, तौहीद वय २० वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रेहान वय २२ वर्षे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत