Delhi building collapsed : दिल्लीत मध्यरात्री इमारत कोसळली! दोन मजुरांचा चिरडून मृत्यू

एक मजूर गंभीर जखमी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) काल मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. ईशान्य दिल्लीतील वेलकम भागातील कबीर नगरमध्ये बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली (Building collapsed). या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २:१६ च्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काम सुरू होते. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही, नंतर त्यांना एक घर कोसळल्याचे समजले. अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले.


ढिगाऱ्याखाली तीन मजूर गाडले गेले. तिघांनाही बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जीटीबी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तिसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहीद असे इमारतीच्या मालकाचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुढील तपास सुरू आहे.


कबीर नगर येथील घर कोसळण्याच्या घटनेतील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात अर्शद, वय ३० वर्षे, तौहीद वय २० वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रेहान वय २२ वर्षे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव