Double Murder: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये दोन मुलांची हत्या, आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू

लखनऊ: उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका बाबा कॉलनीमध्ये एका व्यक्तीने दोन मुलांची हत्या केली. यानंतर तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारत आरोपी ठार झाला.


या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहो. पोलीस आणि प्रशासनाने शांततेचे आवाहान केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना मंडी समिती चौकीजवळ बाबा कॉलनीमध्ये एका घरात घुसून व्यक्तीने ११ आणि ६ वर्षांच्या दोन छोट्या मुलांची हत्या केली. यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकांना शांतता राखण्यास सांगितले. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. प्रकरणाचा तपास केला जात आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. यात तो मारला गेला. आरोपीचे वय २५ ते ३० वय यादरम्यान होते. या हल्ल्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या