Bank: बँकेची कामे राहिली आहेत का? तर हे नक्की वाचा

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रविवारी ३१ मार्चलाही बँका सुरू राहणार आहेत. आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट तर या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय बँकेने म्हटले की ३१ मार्च २०२४ला रविवार असतानाही सर्व बँका सुरू राहतील. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


आरबीआयने म्हटले की ३१ मार्चला आर्थिक वर्षाची समाप्ती आहे. यासाठी सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत होणारे व्यवहार त्याच दिवशी दिसले पाहिजे यासाठी सर्व बँकांना रविवारच्या दिवशी काम करण्यास सांगितले आहे. सर्व बँक ३१ मार्चला रविवारी आपल्या नियमित वेळेत उघडतील आणि बंद होतील. शनिवारीही सर्व बँका सुरू राहतील. याशिवाय एनईएफटी आणि आरटीजीएसचे व्यवहारही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय सरकारी चेक क्लिअरिंगसाठीही विशेष सोय केले जाईल. दरम्यान, स्टॉक मार्केट बंद राहील.



इनकम टॅक्स ऑफिसही सुरू राहणार


याआधी इनकम टॅक्स विभागानेही आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विभागाने गुड फ्रायडेच्या सुट्टीसहित शनिवारी आणि रविवारची सुट्टीही रद्द केली होती. इनकम टॅक्स विभागाने गुड फ्रायडेमुळे या महिन्यात येणाऱ्या लाँग वीकेंडला रद्द केले होते. गुड फ्रायडे २९ मार्चला आहे. ३० मार्चला शनिवार आणि ३१ मार्चला रविवार आहे. यासाठी ३ दिवसांची मोठी सुट्टी येत होती. मात्र इतकी सुट्टी असल्यास अनेक कामे रखडणार होती. त्यामुळे ही संपूर्ण सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या