Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला!' संतोष बांगरांची सणसणीत टीका

'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' म्हणत संजय राऊतांवरही केली खोचक टीका


संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा केला 'लाळचाटे' असा उल्लेख


हिंगोली : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगेच हिंगोली (Hingoli) दौरा केला. यावेळी त्यांनी शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर टीका केली. पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असं म्हणत बांगर यांनी ठाकरेंवर सणसणीत टीका केली आहे. यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे.


आमदार संतोष बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नये म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. काल मी मुंबईत असतांना एक म्हातारी भेटली आणि मी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे तिला महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, यामुळे अक्षरशः वेदना होतात," असे बांगर म्हणाले.



उद्धव ठाकरेंचे सर्व चेलेचपाटे खंडण्या बहाद्दूर


पुढे बांगर म्हणाले की, “आम्ही काम करून जमीन भुसभुशीत केली, पण काळाच्या सभा पाहता काय परिस्थिती झाली. २०१९ मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती, सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर असल्याच" बांगर म्हणाले.



माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान


दरम्यान, याचवेळी संतोष बांगर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सुद्धा टीका केली. 'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' असं म्हणत बांगर यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना समजत कसं नाही? याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. संजय राऊत आणि अंबादास दानवे (Ambadas Danave) लाळचाटे लोकं आहेत. या लोकांच्या नादी लागू नये, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे" असंही बांगर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका