Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला!' संतोष बांगरांची सणसणीत टीका

'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' म्हणत संजय राऊतांवरही केली खोचक टीका


संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा केला 'लाळचाटे' असा उल्लेख


हिंगोली : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगेच हिंगोली (Hingoli) दौरा केला. यावेळी त्यांनी शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर टीका केली. पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असं म्हणत बांगर यांनी ठाकरेंवर सणसणीत टीका केली आहे. यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे.


आमदार संतोष बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नये म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. काल मी मुंबईत असतांना एक म्हातारी भेटली आणि मी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे तिला महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, यामुळे अक्षरशः वेदना होतात," असे बांगर म्हणाले.



उद्धव ठाकरेंचे सर्व चेलेचपाटे खंडण्या बहाद्दूर


पुढे बांगर म्हणाले की, “आम्ही काम करून जमीन भुसभुशीत केली, पण काळाच्या सभा पाहता काय परिस्थिती झाली. २०१९ मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती, सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर असल्याच" बांगर म्हणाले.



माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान


दरम्यान, याचवेळी संतोष बांगर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सुद्धा टीका केली. 'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' असं म्हणत बांगर यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना समजत कसं नाही? याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. संजय राऊत आणि अंबादास दानवे (Ambadas Danave) लाळचाटे लोकं आहेत. या लोकांच्या नादी लागू नये, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे" असंही बांगर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात