कपालेश्वर मंदिरात पूजेचा अधिकार कुणाला?

Share

गुरव कंपनीचे भांडण निवाड्यासाठी न्यायालयाच्या दरबारात

नाशिक : भोळ्या महादेवासमोर नंदी नसलेले पृथ्वी तलावरील एकमेव मंदिर म्हणून प्रख्यात असलेले नाशिकच्या रामकुंडावरील कपालेश्वर महादेव मंदिर अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने पुजारीच पावित्र्य कलंकित करीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आधी विश्वस्त आणि पुजारी यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध, दानपेटीबाबतचे राजकारण करणाऱ्या पुजाऱ्यांच्या वर्तनामुळे भोळा म्हणून ओळखला जाणारा महादेव नाहक बदनाम होत आहे आणि आता तर मंदिरात पूजा कुणी करायची याबाबत नव्याने वाद उपस्थित केला गेला असून थेट जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.

यातील वादी प्रभाकर श्रीधर गाडे शामराव श्रीधर गाडे,ॲड अविनाश श्रीधर गाडे,प्रसाद शरदचंद्र गाडे,जगदीश शरदचंद्र गाडे, रुपाली हेमंत गाडे, मिलिंद अरविंद गाडे यांनी हेमंत उर्फ पप्पू पद्माकर गाडे, प्रकाश उर्फ साहेबराव पद्माकर गाडे, प्रभावती चंद्रकांत जगताप, अनिल जनार्दन भगवान, रमाकांत सोनोजी शेवाळे, अनिता अनिल शेवाळे यांच्याविरुद्ध नशिक जिल्हा न्यायालयात स्पेशल सिव्हिल सुट क्र. 0000255/2024 Specific relief act ३४,३८ प्रमाणे दाखल केला असून या दाव्यामुळे कपालेश्वर मंदिरात कोणते गुरव पूजा करू शकतात याबाबत नागरिकांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

नेमका हा वाद का?

दानपेटी मधील पैशावरून हा वाद झाला आहे अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून शहरात सुरु आहे. ज्यांनी दावा दाखल केला ते वादी यांना प्रतिवादी हेमंत उर्फ पपू पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून रोखत आहेत. सदर वाद हा मागील २० दिवसापासून चालू असून दावा दाखल केलेले गुरव आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रतिवादी पप्पू उर्फ हेमंत पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून थांबवत असून मंदिरात येणारे दानपेटी मधील सर्व पैसे स्वतःच घेत असल्याचा आरोप काही भक्त करीत आहेत.

नाशिक शहरातील अतिप्राचीन असलेले कपालेश्वर महादेव मंदिर येथे गुरव लोकांमध्ये मध्ये वाद चालू आहे. त्या अनुषंगाने गुरव ॲड अविनाश श्रीधर गाडे यांच्या बाजूने ७ परीवार तर यांनी गुरव हेमंत उर्फ पपू गाडे यांच्या बाजूने ६ परीवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात एक सूट दाखल केला असून उद्या त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी आहे. संबंधित गुरव यांच्या ताब्यात एक दानपेटी असून सदर दानपेटी मध्ये येणाऱ्या पैशातून हा वाद निर्माण झाला आहे. ॲड अविनाश गाडे यांनी दाखल केलेल्या सूटमध्ये १० लाख रुपये दानपेटीमध्ये आलेले असून त्याची नुकसान भरपाई ही वादी ॲड अविनाश गाडे व इतर गुरव यांनी मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला आहे असे समजते. – प्रशांत जाधव, अध्यक्ष, कपालेश्वर संस्थान

Recent Posts

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

3 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

25 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

27 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

2 hours ago