४ जूनला नव्हे तर २ जूनला लागणार या राज्यात निवडणुकीचे निकाल

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेश(arunachal pradesh) आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनऐवजी २ जूनला लागणार आहेत. खरंतर, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. अशातच मतमोजणीचे काम २ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी ४ जूनची तारीख ठरवली होती. त्यात बदल केला आहे. आता येथील मतमोजणी २ जूनला होणार आहे.


अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानलभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिलला होणार आहे. आयोगानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला जारी होईल. यांतर नामांकन प्रक्रिया सुरू केली जाईल. नाव मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्चला आहे.



अरूणाचलमध्ये दोन लोकसभा आणि ६० विधानसभेच्या जागा


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी ४ जूनला होणार होती. अरूणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या ६० जागा आहे. राज्याचा सध्याचा विधानसभेचा कार्यकाल २ जूनला संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील दोन लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेत भाजपने ४१ जागा जिंकल्या तर जनता दल(युनायटेड)ने सात जागा, एनपीपीने पाच आणि काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला होता. पीपीएने एक जागा जिंकली तर दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू