चंदीगढ : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) सिद्धू मुसेवालाची (Siddu Moosewala) आई चरण कौर सिंह (Charan Kaur Singh) गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक वृत्तसंस्थांनी तशी बातमीही दिली होती. मात्र, काहीच दिवसांपूर्वी सिद्धूचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी ही अफवा असल्याचे सांगत लवकरच आम्ही जे काही असेल ते तुम्हा सर्वांसोबत शेअर करु असे म्हटले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी सिद्धूच्या सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मुसेवाला घराण्याला आता नवा वारस मिळाला आहे. सिद्धूच्या आईबाबांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या (IVF Technology) मदतीने बाळाला जन्म दिला आहे.
वयाच्या ५८ व्या वर्षी चरण सिंह कौर पुन्हा एकदा आई झाल्या आहेत. सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. ऐन उमेदीच्या काळात सिद्धूच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला होता. त्याचे आईवडील अत्यंत एकटे पडले होते. त्यामुळे त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा आईबाबा होण्याचा निर्णय घेतला.
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळदेखील दिसत आहे. बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत त्यांनी पंजाबीमध्ये लिहिलं आहे,”शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने आज त्याच्या धाकट्या भावाचं स्वागत करत आहोत. देवाच्या आशीर्वादाने बाळ सुखरुप आहे. सर्व हितचिंतकांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे”.
सोशल मीडियावर आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…