Milind Deora : शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन लगावले टोले

'आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत' म्हणत राहुल गांधींवरही केली अप्रत्यक्ष टीका


मुंबई : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park, Dadar) सांगता होणार आहे. त्यासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधींसह (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवाजी पार्कमधील सभेवरुन उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत. तसेच 'आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत' असं म्हणत राहुल गांधींवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.


मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज शिवाजी पार्कवर तुम्हाला पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..., सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील... मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..., आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो..., ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.




Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती