Milind Deora : शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन लगावले टोले

Share

‘आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत’ म्हणत राहुल गांधींवरही केली अप्रत्यक्ष टीका

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park, Dadar) सांगता होणार आहे. त्यासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधींसह (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवाजी पार्कमधील सभेवरुन उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत. तसेच ‘आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत’ असं म्हणत राहुल गांधींवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.

मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज शिवाजी पार्कवर तुम्हाला पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील… मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही…, आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो…, ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

Recent Posts

Afganisthan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप!

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…

36 minutes ago

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगाल हातून निसटतोय”- मिथुन चक्रवर्ती

कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…

45 minutes ago

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

2 hours ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

2 hours ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

3 hours ago