PM Narendra Modi : मेरे प्रिय परिवारजन... आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांचं देशवासियांना पत्र!

काय म्हटलं आहे पत्रात?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तारखा आज जाहीर होणार असून आचारसंहिता (Code of conduct) लागू होणार आहे. तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांसाठी एक पत्र (Letter) लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. 'मेरे प्रिय परिवारजन' असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.


पत्रामध्ये मोदी म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झालं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला कायम मिळणार, असा मला विश्वास आहे. देशातल्या १४० कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. या नात्याला शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे.


मोदी पत्रामध्ये लिहितात, राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत.


त्यांनी पत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारतच्या माध्यमातून दिलेल्या सोयीसुविधा, मातृवंदना योजना, जीएसटी, कलम ३७०, तीन तलाख, महिलांसाठीचं नारी शक्ती वंदन विधेयक याविषयी माहिती दिली. याशिवाय आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंगण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.


पंतप्रधानांनी पत्रामध्ये शेवटी म्हटलंय की, लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणं, मोठ्या योजना बनवणं आणि त्या लागू करणं लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे, अशा भावना पंतप्रधानांनी या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.




Comments
Add Comment

CM Siddaramaiah Give Resignation : मोठी बातमी ! सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा, राजीनाम्याचे कारणही समोर

Karnataka : कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी थेट कर्नाटकच्या (Karnataka)

NEET Paper Leak 2026 : नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी आता भारतीय लष्कराची मदत? गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रसरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर (NEET Paper Leak 2026) केंद्र सरकार आता मोठी आणि कठोर

Bihar Boat Accident News : हळहळ! १४ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू, अनेकजण अद्याप बेपत्ता

पाटणा : बिहारच्या बरह उपविभागातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रसिद्ध अशा

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Thalapathy vijay meets pm narendra modi : CM थलपती विजय यांनी घेतली PM मोदींची भेट! २५ मिनिटांच्या चर्चेने वाढवले राजकीय तापमान!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे (Tamilnadu Minister) नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (थलपती विजय) (Vijay Joseph) हे