Rajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है... काय म्हणाले राजीव कुमार?

फेक न्यूज पसरवणार्‍यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिला संदेश


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजीव कुमार यांनी सादर केलेली शायरी (Shayri).


आजकाल सोशल मीडियावर (Social Media) पसरणार्‍या फेक न्यूजमुळे (Fake News) समाजात असंतोष निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पत्रकारांकडून देखील पूर्णपणे खात्री करुन न घेता थेट बातमी दिली जाते. त्यामुळे लोक देखील याबाबत शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. यावर भाष्य करताना राजीव कुमार यांनी एक शायरी सादर केली.



राजीव कुमार म्हणाले, "सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे की, एकदा खात्री करुन घ्या. म्हणजे जी काही बातमी येते ती लगेच फॉरवर्ड करता कामा नये. हा एक खूप मोठा खोट्याचा बाजार आहे. मी याबाबत विचार करत असताना काही ओळी मला सुचल्या त्या ऐकवतो -
झूठ के बाजार में रौनक तो बहुत है
गोया बुलबुले जैसी तुरन्त ही फट जाती है
तुम्ही बुलबुला पकडायला गेलात तरी तुम्हाला यात धोकाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे एखादी माहिती पुढे पाठवायची की नाही यावर विचार करा', असा संदेश त्यांनी दिला.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक