Rajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है... काय म्हणाले राजीव कुमार?

फेक न्यूज पसरवणार्‍यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिला संदेश


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजीव कुमार यांनी सादर केलेली शायरी (Shayri).


आजकाल सोशल मीडियावर (Social Media) पसरणार्‍या फेक न्यूजमुळे (Fake News) समाजात असंतोष निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पत्रकारांकडून देखील पूर्णपणे खात्री करुन न घेता थेट बातमी दिली जाते. त्यामुळे लोक देखील याबाबत शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. यावर भाष्य करताना राजीव कुमार यांनी एक शायरी सादर केली.



राजीव कुमार म्हणाले, "सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे की, एकदा खात्री करुन घ्या. म्हणजे जी काही बातमी येते ती लगेच फॉरवर्ड करता कामा नये. हा एक खूप मोठा खोट्याचा बाजार आहे. मी याबाबत विचार करत असताना काही ओळी मला सुचल्या त्या ऐकवतो -
झूठ के बाजार में रौनक तो बहुत है
गोया बुलबुले जैसी तुरन्त ही फट जाती है
तुम्ही बुलबुला पकडायला गेलात तरी तुम्हाला यात धोकाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे एखादी माहिती पुढे पाठवायची की नाही यावर विचार करा', असा संदेश त्यांनी दिला.

Comments
Add Comment

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि