Rajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है... काय म्हणाले राजीव कुमार?

  109

फेक न्यूज पसरवणार्‍यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिला संदेश


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजीव कुमार यांनी सादर केलेली शायरी (Shayri).


आजकाल सोशल मीडियावर (Social Media) पसरणार्‍या फेक न्यूजमुळे (Fake News) समाजात असंतोष निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पत्रकारांकडून देखील पूर्णपणे खात्री करुन न घेता थेट बातमी दिली जाते. त्यामुळे लोक देखील याबाबत शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. यावर भाष्य करताना राजीव कुमार यांनी एक शायरी सादर केली.



राजीव कुमार म्हणाले, "सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे की, एकदा खात्री करुन घ्या. म्हणजे जी काही बातमी येते ती लगेच फॉरवर्ड करता कामा नये. हा एक खूप मोठा खोट्याचा बाजार आहे. मी याबाबत विचार करत असताना काही ओळी मला सुचल्या त्या ऐकवतो -
झूठ के बाजार में रौनक तो बहुत है
गोया बुलबुले जैसी तुरन्त ही फट जाती है
तुम्ही बुलबुला पकडायला गेलात तरी तुम्हाला यात धोकाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे एखादी माहिती पुढे पाठवायची की नाही यावर विचार करा', असा संदेश त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी