Loksabha Election : उद्या जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा!

निवडणूक आयोगाची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद


नवी दिल्ली : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. ही निवडणूक नेमकी कधी असणार याबाबत राजकीय पक्षांसह (Political Parties) जनताही उत्सुक आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता सर्वांचीच प्रतिक्षा संपली असून उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.


लोकसभेच्या निवडणुका यावेळी ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असा अंदाज आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही (Code of Conduct) लागू होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 'दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते' असं वक्तव्य केलं होतं, ते खरं ठरणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा १६ मार्चला केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाईचे टप्पे जाहीर होतील. उद्या निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष असणार आहे.



सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार


२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. २३ मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.


Comments
Add Comment

CM Siddaramaiah Give Resignation : मोठी बातमी ! सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा, राजीनाम्याचे कारणही समोर

Karnataka : कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी थेट कर्नाटकच्या (Karnataka)

NEET Paper Leak 2026 : नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी आता भारतीय लष्कराची मदत? गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रसरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर (NEET Paper Leak 2026) केंद्र सरकार आता मोठी आणि कठोर

Bihar Boat Accident News : हळहळ! १४ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू, अनेकजण अद्याप बेपत्ता

पाटणा : बिहारच्या बरह उपविभागातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रसिद्ध अशा

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Thalapathy vijay meets pm narendra modi : CM थलपती विजय यांनी घेतली PM मोदींची भेट! २५ मिनिटांच्या चर्चेने वाढवले राजकीय तापमान!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे (Tamilnadu Minister) नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (थलपती विजय) (Vijay Joseph) हे