Pankaja Munde : धनंजय मुंडेंनी सहकार्य केले तर... काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंबाबतही व्यक्त झाल्या पंकजाताई


बीड : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काल ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ही सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि प्रीतम मुंडे यांच्याविषयीही त्या व्यक्त झाल्या.


पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभेसाठी मला उमेदवारी जाहीर झाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझी भावना आभाराची आहे. थोडी संमिश्र भावना यासाठी आहे कारण १० वर्षे प्रीतम मुंडे खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण करत होते. आता केंद्रात राजकारण करणार आहे. तसा प्रभारी म्हणून कामाचा अनुभव आला आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर डॉक्टरीपेशा सोडून प्रीतम राजकारणात आल्या, गेली १० वर्षे त्या संसदेत होत्या. आमच्या दोघींमध्ये समन्वय होता. प्रीतम मुंडेंना मी विस्तारीत करणार नाही. त्या शद्बावर मी कायम आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.



मी निवडून येण्यासाठी धनंजय मुंडेंचं योगदान असेल


उमेदवारी जाहीर झाली आता धनंजय मुंडे यांची भेट घेणार का? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "माझे बंधू धनंजय हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि भाजप यांची राज्यात युती आहे. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. आमच्या युतीनंतर माझ्या मतदार संघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर मला लोकसभेची संधी मिळाली. त्यामुळे जेवढ्या मताने प्रीतमताई निवडून आली होती. त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान असेल."



धनंजय मुंडेंनी सहकार्य केले तर...


धनंजय मुंडेंना परळीत सहकार्य करणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्यांनी सहकार्य केले तर त्यांना देखील सहकार्य मिळेल.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव