IPL 2024: आयपीएलवर जलसंकट, टेन्शनमध्ये बीसीसीआय

मुंबई: उन्हाळा अजून नीटसा सुरूच झाला नाही आणि फेब्रुवारी महिन्यापासूनच हायटेक शहर बंगळुरूमध्ये जलसंकट सुरू झाले आहे. इतकी परिस्थिती बिघडली आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पाण्याची कमतरता झाली आहे. लाखो लोक पाण्यासाठी तरसत आहेत. मात्र यातच इंडियन प्रीमियर लीगबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे टेन्शन वाढले आहे.


खरंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२४च्या हंगामातील सुरूवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. या दरम्यान ३ सामने बंगळुरूच्या एम के चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. पहिला सामना २५ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे.



सुरूवातीच्या सामन्यांवर होणार परिणाम?


मात्र त्याआधी या शहरात आलेल्या जलसंकटामुळे सामना होणे कठीण दिसत आहे. यातच येथील सामने दुसऱ्या मैदानावर शिफ्ट केले जावेत अशी मागणी केली जात आहे. यातच KSCA ने स्पष्ट केले आहे की या जलसंकटाचा परिणाम आयपीएलच्या सुरूवातीच्या तीन सामन्यांवर होणार नाही कारण स्टेडियमच्या सीवेज संयंत्राचे पाणी मैदानाचे आऊटफिल्ड आणि पिचसाठी केला जाईल.


KSCAचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभेंदु घोष म्हणाले, सध्या आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करत नाही आहोत. आम्हाला पाण्याच्या वापराबद्दल राज्य सरकारकडून माहिती मिळाली आहे. आम्ही दिशानिर्देशांचे पालन करण्याबाबत सातत्याने मीटिंग करत आहोत.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला