IPL 2024: आयपीएलवर जलसंकट, टेन्शनमध्ये बीसीसीआय

मुंबई: उन्हाळा अजून नीटसा सुरूच झाला नाही आणि फेब्रुवारी महिन्यापासूनच हायटेक शहर बंगळुरूमध्ये जलसंकट सुरू झाले आहे. इतकी परिस्थिती बिघडली आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पाण्याची कमतरता झाली आहे. लाखो लोक पाण्यासाठी तरसत आहेत. मात्र यातच इंडियन प्रीमियर लीगबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे टेन्शन वाढले आहे.


खरंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२४च्या हंगामातील सुरूवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. या दरम्यान ३ सामने बंगळुरूच्या एम के चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. पहिला सामना २५ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे.



सुरूवातीच्या सामन्यांवर होणार परिणाम?


मात्र त्याआधी या शहरात आलेल्या जलसंकटामुळे सामना होणे कठीण दिसत आहे. यातच येथील सामने दुसऱ्या मैदानावर शिफ्ट केले जावेत अशी मागणी केली जात आहे. यातच KSCA ने स्पष्ट केले आहे की या जलसंकटाचा परिणाम आयपीएलच्या सुरूवातीच्या तीन सामन्यांवर होणार नाही कारण स्टेडियमच्या सीवेज संयंत्राचे पाणी मैदानाचे आऊटफिल्ड आणि पिचसाठी केला जाईल.


KSCAचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभेंदु घोष म्हणाले, सध्या आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करत नाही आहोत. आम्हाला पाण्याच्या वापराबद्दल राज्य सरकारकडून माहिती मिळाली आहे. आम्ही दिशानिर्देशांचे पालन करण्याबाबत सातत्याने मीटिंग करत आहोत.

Comments
Add Comment

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर