तुम्ही BSNL वापरता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने(BSNL) आपल्या स्वस्त प्लानमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. याचा सरळ परिणाम त्यांच्या लाखो युजर्सवर पडणार आहे. खरंतर, या कंपनीने आपल्या ९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी कमी केली आहे. यामुळे जे युजर्स हा प्लान वापरत होते त्यांना आता हा प्लान आधीपेक्षा महाग पडणार आहे.



बीएसएनएलने महाग केला प्लान


दरम्यान, युजर्सला आता बीएसएनएलच्या या प्लानसाठी ९९ रूपयेच खर्च करावे लागतील मात्र त्याची व्हॅलिडिटी आधीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आता या प्लानसाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागतील. बीएसएनएलच्या ९९ रूपयांच्या प्लानमध्ये आधी १८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. मात्र आता युजर्सला केवळ १७ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलने या प्लानच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही मात्र व्हॅलिडिटी कमी करून या प्लानच्या डेली कॉस्टमध्ये वाढ केली आहे.


बीएसएनएलच्या युजर्सला या प्लानसाठी रोजचा खर्च ५.५० रूपये होत होता. आता त्यांचा हा खर्च ५.८२ रूपये इतका झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मइते. या प्लानमध्ये युजर्सला कोणतेही डेटाचे फायदे अथवा इतर फायदे मिळत नाहीत.


हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना इंटरनेट डेटाची नव्हे तर केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान हवा आहे. अशातच या युजर्सना आता हा बीएसएनएलचा प्लान महाग पडणार आहे.


काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही आपल्या दोन रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की टेलिकॉम कंपन्यांना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचे असेल तर रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करावीच लागेल.

Comments

V A Adake    March 16, 2024 01:13 PM

Very true.zero network always.the only govt.institution is working for नाम के वास्ते, ------------------most lover of BSNL.

Shreyas Sunil Khirid    March 15, 2024 11:51 AM

भारत सरकार बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांवर फुकट पैसे खर्च करत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम, recharge, कस्टमर केअर ही बॅक office कर्मचारी सगळे आळशी आहे.

Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर