३६ वर्षीय 'बबिता जी'ने केला २७ वर्षांच्या टप्पूशी साखरपुडा?

मुंबई: तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो आहे. या मालिकेतील प्रत्येक चेहऱ्याला चाहत्यांनी पसंती दिली. या मालिकेत बबिता जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुनमुन दत्ता या अभिनेत्रीबाबत आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुनमुन दत्ताने या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणार राज अनादकट याच्याशी साखरपुडा केला आहे. राज तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.



वडोदरामध्ये झाले मुनमुन आणि राजचा साखरपुडा


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी मुनमुन आणि राज यांचा साखरपुडा झाला आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी मुंबईबाहेर म्हणजेच वडोदरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. त्यांच्या कुटुंबियाना दोघांच्या नात्याबाबत कोणताही आक्षेप नाही आणि ते खूप खुश आहेत.



शोच्या सेटवर राज आणि मुनमुनला झाले प्रेम


गेल्या काही काळापासून मुनमुन आणि राज यांच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. बातमीनुसार जेव्हा राजने शोमध्ये एंट्री केली तेव्हा त्याची भेट मुनमुनशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. याची माहिती शोच्या बाकमी कलाकारांनाही होती. राज आता या शोमध्ये नाही. त्याने काही काळ काम केल्यानंतर शोला अलविदा म्हटले होते. यानंतर शोच्या प्रेक्षकांना मोठा झटका लागला होता.

Comments
Add Comment

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे

काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो

पाचवा वेद - भालचंद्र कुबल हल्ली पाचवा वेद छापून आला आणि तो समाज माध्यमातून व्हायरल झाला की फोन यायला सुरुवात

‘साज़-ए-गझल’: सुरांचा आणि शब्दांचा हृद्य अनुभव

गझल... म्हणजे नुसते शब्द नव्हेत, ती आहे प्रत्येक भावना शब्दांत गुंफण्याची कला! विरह, प्रेम, जीवन आणि आत्मचिंतन