Chala hawa yeu dya : आज थुकरटवाडीत शूटिंगचा शेवटचा दिवस!

झी मराठी वाहिनीने अचानक घेतला कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय


मुंबई : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा एकेकाळी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असणारा कार्यक्रम आता बंद होणार आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होणार असल्याची फक्त चर्चा होती, मात्र आता झी मराठी वाहिनीने (Zee Marathi channel) अचानक कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत टीममधील केवळ चार कलाकारांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण टीमसाठी हा एक मोठा धक्का आहे.


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सुरुवातीची काही वर्षे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. याच्या राज्यभरात झालेल्या दौर्‍यांनाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षात हा कार्यक्रम टीआरपीच्या (TRP) शर्यतीत मागे पडत गेला. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, याबद्दल झी मराठीच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'मधील भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugde) या चौघांनाच कल्पना दिली होती. इतर विनोदवीर आणि क्रू मेंबर यांना काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या २०० पेक्षा अधिक मंडळींना याचा धक्का बसला आहे. 'चला हवा येऊ द्या' अचानक बंद होणार असल्याने या सर्व कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.



'चला हवा येऊ द्या'ची टीम चॅनलवर नाराज


गेल्या १० वर्षांपासून आपण ज्या कार्यक्रमाचा भाग आहोत तो कार्यक्रम अचानक काही कारणाने बंद होत असल्याने 'चला हवा येऊ द्या'च्या संपूर्ण टीमकडून चॅनलवर नाराजी व्यक्त केली जात आहे. सागर कारंडेने सर्वात आधी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून निरोप घेतला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेने काही काळासाठी ब्रेक घेतला. त्यानंतर लगेचच कुशल बद्रिकेने देखील कार्यक्रम सोडला. पण चॅनलसोबत बोलणं झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कार्यक्रम करण्यास होणार दिला होता.



'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड असणार खास


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड खूपच खास असणार आहे. अत्यंत दिमाखात या कार्यक्रमाचं शूटिंग पार पडणार असून विनोदवीरांसाठी खास निरोपसमारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच 'शिवा', 'पारू', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला' या कार्यक्रमांचं प्रमोशन होणार आहे. 'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर