Vasant More : राज ठाकरेंकडे माफी मागत वसंत मोरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'!

  81

'या' पक्षात करणार प्रवेश


मुंबई : मनसेचे (MNS) अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित त्यांनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आहे. यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.


वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. त्याचबरोबर वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांनी आज सकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती, त्यानंतर दुपारी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला.



फेसबुक अकाऊंटवरुन केली निराशाजनक पोस्ट


आज सकाळी वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक निराशाजनक पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो... त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...'. त्यांच्या या पोस्टवरुन मनसेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली. वसंत मोरे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या, ज्याला काही वेळातच पुष्टी मिळाली.



राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले वसंत मोरे?


वसंत मोरे म्हणाले, मी लवकरच माझी भूमिका जाहीर करेन. अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. पक्षातील काही नेत्यांकडून त्रास होत होता. पुणे शहरात मी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक होतो. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत गोष्टी, वारंवार माझ्यावर होणारे आरोप, मी स्वतंत्र राजकारण करत असल्याचा आरोप होत होता. माझ्या वागणुकीवर आणि चरित्र्यावर आरोप केले जात होते. मी आता मनसे सोडली आहे. मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी आता संघटेनेमध्ये नाही. माझी पुढील भूमिका पुणेकर ठरवतील, असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही