मोदी सरकारची मोठी घोषणा, CAAची अधिसूचना जारी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने सीएएची म्हणजेच नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना जारी केली आहे. सरकारने याबाबतची अधिकृत घोषणा केली. यानुसार देशातात सीएए लागू झाला आहे.


या कायद्यामध्ये भारताच्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. यासाठी केंद्र सरकारने पोर्टल तयार केले असून त्यावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.


याआधी भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला भारतात ११ वर्षे राहणे गरजेचे होते. मात्र आता या कायद्यान्वये हा कालावधी ६ वर्षांवर येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारने हा अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.


२०१९मध्ये संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाला होता. मात्र या मंजुरीनंतर देशभरात बऱ्याच ठिकाणी यांच्याविरोधात आंदोलने झाली. विरोधकही या कायद्याच्या विरोधात होते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या कायद्यामुळे भारताच्या शेजारील देशातून येणाऱ्या इतर धर्मीयांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.


यासाठी केंद्र सरकारकडून वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील नागरिकांचा समावेश असेल. या वेब पोर्टलवर नागरिकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर सरकारकडून योग्य ती तपासणी प्रक्रिया केली जाईल. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळेल.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे