Manoj Jarange Patil : मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जाहीर सभा घेणार!

लोकसभा निवडणुकीपूर्वी केली मोठी घोषणा


बीड : देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Elections) वारे वाहत आहेत. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण (Maratha reservation) देऊ केलं. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे असमाधानी असून त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी धरुन लावली आहे. तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा विराट सभा घेण्यात येत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. बीडमधील (Beed) गाठीभेटी दरम्यान जरांगेंनी जाहीर सभेची घोषणा केली.


ऐन निवडणुकांच्या प्रचाराच्या धुराळ्यात मराठा आरक्षणाचाही धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे म्हणाले आहेत की, सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील, असे जरांगे यांनी सांगितले.


लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे. ९०० एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीची मागणी करणारी ही सभा असणार आहे.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा