Manoj Jarange Patil : मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जाहीर सभा घेणार!

लोकसभा निवडणुकीपूर्वी केली मोठी घोषणा


बीड : देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Elections) वारे वाहत आहेत. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण (Maratha reservation) देऊ केलं. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे असमाधानी असून त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी धरुन लावली आहे. तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा विराट सभा घेण्यात येत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. बीडमधील (Beed) गाठीभेटी दरम्यान जरांगेंनी जाहीर सभेची घोषणा केली.


ऐन निवडणुकांच्या प्रचाराच्या धुराळ्यात मराठा आरक्षणाचाही धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे म्हणाले आहेत की, सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील, असे जरांगे यांनी सांगितले.


लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे. ९०० एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीची मागणी करणारी ही सभा असणार आहे.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात