भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला झटका, टीम इंडिया तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल

दुबई: भारताने(india) इंग्लंडला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यावर सलग चार सामने जिंकत मालिका ४-१ अशी खिशात घातली. टीम इंडियाचा हा मालिका विजय आयसीसीच्या रँकिंगमध्येही त्यांना फायदेशीर ठरला आहे. भारताने धरमशालामध्ये इंग्लंडला चांगलीच मात देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.


भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या पद्धतीने भारतीय संघ खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.


न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ख्राईस्टचर्च येथे सुरू असलेल्या सामन्याचा निकाल काहीही असला तरी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सध्याचा विजेचा ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टनमध्ये पहिला कसोटी सामना १७२ धावांनी जिंकला होता आणि आता ते या मालिकेत १-० असे आघाडीवर आहेत.


भारताचे कसोटी रँकिंगमध्ये आता १२२ रेटिंग झाले आहेत जे ऑस्ट्रलियापेक्षा पाच अंकांनी अधिक आहे. इंग्लंडचा संघ १११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत. वनडेत भारताचे १२१ रेटिंग आहे तर ऑस्ट्रेलिया ११८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीमध्ये भारताचे २६६ अंक आहेत. इंग्लंडचे या प्रकारात २५६ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत.


Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे