Lok Sabha Election : होऊ दे खर्च... लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ

मुंबई : लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारास खर्चाची मर्यादा ७० लाख होती ती आता ९५ लाख करण्यात आली आहे. तर अनामत रक्कम २५ हजार रुपये आहे. मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारास सूचक म्हणून एक तर अमान्यताप्राप्त मात्र नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारास, अपक्ष उमेदवारास दहा जणांनी सूचक म्हणून असायला हवेत, या अटी आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, निवडणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांसह पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. राजकीय पक्षाचा अ, ब फॉर्म, नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दुपारी तीन वाजेच्या आत दिला तरी चालणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना नजिकच्या काळात काढलेले फोटो द्यावयाचे आहेत. तोच फोटो मतदान यंत्रात लावला जाणार आहे. उमेदवार एकावेळी केवळ दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. जे ज्येष्ठ नागरिक आहेत व ते घरी बेडवर आहेत अशांसाठी घरीच मतदानाची सोय करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी फोनची सुविधा नाही अशा अतिदुर्गम, आदिवासी गावात ‘ड्रोन’द्वारे दर दोन तासांनी किती मतदान झाले याची माहिती घेतली जाईल. याबाबत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे. काही ठिकाणी वनविभागाची वॉकीटॉकी वापरण्यात येणार आहे.


जे ज्येष्ठ नागरिक आहेत व ते घरी अंथरुणाला खिळले आहेत अशांसाठी घरीच मतदानाची सोय करण्यात येणार आहे. विवाह झालेल्या महिलांनी सासरी आल्यावर मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे. अनेक महिला मतदार नोंदणी करीत नाहीत. अकरा विधानसभा क्षेत्रात पाच ठिकाणी आदर्श मतदान केंद्र असणार आहे. त्यात पाळणाघरांसह लहान मुलांच्या मनोरंजनाची सोय असेल, सोबत इतर सोळा बाबी विशेष असतील. एक मतदान केंद्र असे असेल त्यात फक्त महिलाच अधिकारी, कर्मचारी असतील. अशा ठिकाणी या महिलांची नियुक्ती केली जाईल. दोन मतदान केंद्रे दिव्यांगासाठी असतील. ज्यात दिव्यांग अधिकारी कार्यरत असतील. एक केंद्र युवकांसाठी असेल. या केंद्रावर स्थानिक जे प्रसिद्ध आहे त्याची संकल्पना राबवून मतदार केंद्राची निमिर्ती केली जाईल.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

कुर्दिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या

Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही

आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ