Lok Sabha Election : बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा; आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत

हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारत राष्ट्र समितीसोबत (BRS) आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि बहुजन समाज पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.


या आघाडीची घोषणा करताना केसीआर म्हणाले की, दोन्ही पक्षांची युती खूप प्रभावी ठरणार आहे. आम्ही यापूर्वी अनेक बाबींवर एकत्रित काम केले आहे. किती जागांवर निवडणूक लढवायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आपण मायावतींशी अद्याप बोललो नाही. सध्या फक्त आरएस प्रवीण कुमार यांच्याशी बोलले आहे.


बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आमची मैत्री तेलंगणाला पूर्णपणे बदलून टाकेल. तसेच केसीआर यांना भेटून आनंदच झाला. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत.


दरम्यान, भारत राष्ट्र समिती-बहुजन समाज पक्षाच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता भारत राष्ट्र समिती तेलंगणातील काही जागा बहुजन समाज पक्षाला सोडण्याची तर भारत राष्ट्र समिती उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षला काही जागा सोडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६