Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत पीडिताच्या कुटुंबाला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.


रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर कागदपत्रांमध्ये वापरण्यात आलेल्या 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' (Second-class passenger) या शब्दप्रयोगावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. न्यायालयाने हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या भावनेशी विसंगत असल्याचे नमूद करत संबंधित कुटुंबाला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे रेल्वेला आदेश दिले. न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने १९ पानी निकालात या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, दस्तऐवज आणि नियमावलींच्या परीक्षणादरम्यान मृत व्यक्तीसाठी 'द्वितीय श्रेणी प्रवासी' ही संज्ञा वापरल्याचे आढळले. तिकीटाच्या दराशी संबंधित वर्गवारी ही डब्याची असते, प्रवाशाची नव्हे, असे स्पष्ट करत न्यायालयाने 'वर्ग' हा शब्द डब्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला. भारतातील वर्गभेदाच्या सामाजिक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे संबोधणे आक्षेपार्ह असून ते संविधानाच्या भावनेच्या विरोधात असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.



हे प्रकरण २०१५ मधील असून, चंद्रकांत ठक्कर यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ वैध तिकीट सापडले नसल्याचे कारण देत रेल्वे दावा न्यायाधिकरणाने (RCT) त्यांच्या पत्नीचा नुकसानभरपाईचा दावा फेटाळला होता. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली. यानंतर मृताच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करत ४ लाख रुपये आणि त्यावरील १८ टक्के व्याजासह नुकसानभरपाईची मागणी केली. त्यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, मृत व्यक्ती तिकीटाशिवाय प्रवास करत नव्हती. अपघातानंतर त्यांची बॅग हरवल्यामुळे त्यामधील तिकीट मिळू शकले नाही.



सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांचे निर्णय रद्द करत स्पष्ट केले की, मृतदेहाजवळ तिकीट आढळले नाही म्हणून संबंधित व्यक्तीचा कायदेशीर प्रवासी म्हणून असलेला दर्जा नाकारता येत नाही. रीना देवी आणि डॉली राणी साहा विरुद्ध भारत सरकार या प्रकरणांतील आधीच्या निर्णयांचा संदर्भ देत न्यायालयाने केवळ तिकीटाच्या अनुपस्थितीच्या आधारावर नुकसानभरपाई नाकारणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यानुसार रेल्वेला मृताच्या पत्नीला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.


प्रवाशांनाही जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा सल्ला


या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने प्रवाशांच्या जबाबदारीवरही भर दिला. रेल्वे सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी केवळ रेल्वे प्रशासनावर टाकता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने अनेकजण रेल्वे पकडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात, त्यामुळे गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण नोंदवले. आर्थिक स्पर्धा आणि दैनंदिन अडचणींमुळे अनेकदा लोक स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात, ही खेदाची बाब असल्याचे सांगत व्यावहारिक अडचणींपेक्षा जीविताचे संरक्षण अधिक महत्त्वाचे मानावे, असा सल्लाही न्यायालयाने दिला.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत