Lok Sabha Election : बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा; आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत

हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारत राष्ट्र समितीसोबत (BRS) आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि बहुजन समाज पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.


या आघाडीची घोषणा करताना केसीआर म्हणाले की, दोन्ही पक्षांची युती खूप प्रभावी ठरणार आहे. आम्ही यापूर्वी अनेक बाबींवर एकत्रित काम केले आहे. किती जागांवर निवडणूक लढवायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आपण मायावतींशी अद्याप बोललो नाही. सध्या फक्त आरएस प्रवीण कुमार यांच्याशी बोलले आहे.


बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आमची मैत्री तेलंगणाला पूर्णपणे बदलून टाकेल. तसेच केसीआर यांना भेटून आनंदच झाला. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत.


दरम्यान, भारत राष्ट्र समिती-बहुजन समाज पक्षाच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता भारत राष्ट्र समिती तेलंगणातील काही जागा बहुजन समाज पक्षाला सोडण्याची तर भारत राष्ट्र समिती उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षला काही जागा सोडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या