Lok Sabha Election : बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा; आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत

हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारत राष्ट्र समितीसोबत (BRS) आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि बहुजन समाज पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.


या आघाडीची घोषणा करताना केसीआर म्हणाले की, दोन्ही पक्षांची युती खूप प्रभावी ठरणार आहे. आम्ही यापूर्वी अनेक बाबींवर एकत्रित काम केले आहे. किती जागांवर निवडणूक लढवायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आपण मायावतींशी अद्याप बोललो नाही. सध्या फक्त आरएस प्रवीण कुमार यांच्याशी बोलले आहे.


बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आमची मैत्री तेलंगणाला पूर्णपणे बदलून टाकेल. तसेच केसीआर यांना भेटून आनंदच झाला. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत.


दरम्यान, भारत राष्ट्र समिती-बहुजन समाज पक्षाच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता भारत राष्ट्र समिती तेलंगणातील काही जागा बहुजन समाज पक्षाला सोडण्याची तर भारत राष्ट्र समिती उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षला काही जागा सोडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला