लखनऊमध्ये LPG सिलेंडर स्फोटात ३ अल्पवयीन मुलींसह ५ जणांचा मृत्यू

लखनऊ: राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी रात्री काकोरी परिसरातील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर चार इतर जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार जरदोजी कारीगर मुशीर अली, त्यांची पत्नी हुस्ना बानो, अल्पवयीन मुली हुमा, हिबा आणि भाची राईया यांचा स्फोटात मृत्यू झाला. या स्फोटाच मुशीर यांच्या दोन मुली एक भाची आणि अजमत या जखमी आहेत.


हा स्फोट इतका भयानक होता की संपूर्ण घर कोसळले आणि आग लागली. मृत मुशीरजवळ फटाक्यांच्या व्यवसायाचा लायसन्सही होता. काही लोकांचे म्हणणे आहे की मुशीर यांच्या रूममध्ये दिवाळीत उरलेले काही फटाकेही होते.


तर घरातील इतर सदस्यांच्या मते आधी शॉट सर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. मंगळवारी मृत्यू पावलेल्या मुशीर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यात सामील होण्यासाठी पाहुणे मंडळी आली होती.


स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे ५ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला