साळावच्या जे.एस.डब्ल्यु. कंपनी प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आजपासून "सामूहिक आमरण उपोषण"

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ, तसेच प्रलंबित मागण्यांसाठी साळावच्या जे.एस.डब्ल्यु. कंपनीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी स्थगित केलेले बेमुदत आमरण उपोषण आज ५ मार्चपासून न्याय मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सामूहिक आमरण उपोषण" सुरु केले आहे.


न्याय मिळण्यास आणखी दिरंगाई झाल्यास सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी “सामूहिक आत्मदहन” करतील असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिली आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑगस्ट २०२३ रोजी बैठक होऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी एक सदस्य समितीचे गठन करून एक महिन्याच्या आत १९८९ व २००९ चे बाधित शेतकऱ्यांच्या संदर्भात मुद्देसहीत अहवाल तयार करण्याचा आदेश दिला होता; परंतु या गोष्टीला आज ५ महिने उलटूनही एक सदस्यीय समितीने अहवाल तयार केला नाही.


२४ जानेवारी २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी बैठक घेऊन तहसीलदार मुरुड व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना १९८९ व २००९ च्या लाभ घेतलेले व लाभ न मिळालेले शेतकरी यांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतिम बैठक आयोजित केली होती; परंतु त्यावरही कोणती कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली नाही. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली झाली आणि अहवाल तयार करण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागेल असे पत्र जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले. या वेळखाऊ प्रक्रियेने व जिल्हा प्रशासनाच्या टाळाटाळ भूमिकेने संतप्त होऊन शेतकऱ्यांनी स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा आजपासून सुरू केले आहे. यानंतरही वेळेत न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाची हाकही दिली आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत