Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

पोलीस नियंत्रण कक्षात आला धमकीचा कॉल


लखनऊ : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या (Lucknow) पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या या धमकीच्या कॉलने खळबळ उडवून दिली आहे.


लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर एक कॉल आला. हा कॉल हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी घेतला. या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉन्स्टेबलने 'तुम्ही कुठून बोलत आहात?' असं विचारलं असता कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला.


या प्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवाली येथील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



पोलीसांकडून तपास सुरू


कॉन्स्टेबलने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या फोनची माहिती दिली, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. सीएम योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत.



तक्रारीत काय म्हटले आहे?


चीफ कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १०.०८ वाजता एक कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सीएम योगींना बॉम्बने उडवले जाईल असे सांगितले. उधम सिंह यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतर उधम सिंह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Comments
Add Comment

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.