‘त्यांचा अली, तर आमचा बजरंग बली’: आमदार नितेश राणे

मुंबई : मालवणी मालाडमध्ये अतिक्रमण करण्याच्या नावाने बाहेरून लोक आणण्यात येत आहेत. माहीम येथून आलेल्या लोकांना इथे मतदार बनविण्यात आले आहे. मस्जिद, मदरशे बांधून हिंदूंना मुंबईबाहेर काढण्याचे षडयंत्र जिहाद्यांचे आहे. कोणी इथे मस्जिद उभारली, तर त्या बाजूला लगेच हनुमान मंदिर उभारा, असा सल्ला देत ‘त्यांचा ‘अली’ तर आमचा बजरंग बली’ अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी दिली.


अवैध गतीविधी व हिंदू हितासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मालाड मालवणी परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यामध्ये आमदार राणे बोलत होते. ते म्हणाले की, त्यांचे उरूस, मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही अटी नियम घालत नाहीत. हिंदू सणांच्या मिरवणुकांना पोलीस अटी घालतात. यांचे डीजे १२ वाजेपर्यंत चालतात. पण हिंदूना १० वाजता डीजे बंद करण्याची सक्ती पोलीस करतात. जेवढा मानसन्मान हिंदू पोलिसांना देतात, तेव्हा जिहादी देतात का, असा सवाल राणे यांनी केला.


लँड जिहादच्या नावाने मालवणीमध्ये अतिक्रमण सुरू आहे. टिपू सुलतानचे बोर्ड जिहादी लावत आहेत. हे लोक संविधान मानत नाहीत. त्यांना संविधान नको आहे, देशात शरिया कायदा लागू करण्याचा यांचा डाव असल्याचा आरोपही राणे यांनी केला. येथे रामनवमीच्या मिरवणुकीत चपला मारण्यात आल्या. म्हणून आता मोर्चात चालत असताना मी मस्जिदसमोर थांबलो, कुणी आज चप्पल भिरकावली असती तर मस्जिदमध्ये जाऊन तमाशा केला असता. ज्यांनी ज्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत चप्पल भिरकावली, त्यांचा हिशोब घेणार असा इशाराही आमदार राणे यांनी यावेळी दिला. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असल्याने त्यामुळे पोलिसांनी येथील हिंदूंच्या महिला, मुलींच्या संरक्षण करावे. अन्यथा पोलिसांना २४ तासांची सुट्टी देऊन मालवणीत भगवा फडकवून दाखवतो, असे आमदार राणे यावेळी म्हणाले.



मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील


मालवणीत एका एका घरात ३०-४० रोहिंगे, बांगलादेशी राहत आहेत. याची पोलिसांकडे कोणतीच आकडेवारी नाही. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही घरात घुसून त्यांचे हात-पाय काढून त्यांच्या देशात पाठवू. मस्जिद, मदरसे आणि अतिक्रमणे वाढवून मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. येथील अनधिकृत बांधकामांवर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा आमचा बुलडोझर चालवू असा इशाराही राणे यांनी प्रशासनाला दिला.



हा मोर्चा नव्हे संदेश


आज काढण्यात आलेला हा मोर्चा नव्हता, तर हिंदू एक असल्याचा संदेश असल्याचे राणे म्हणाले. यापुढे अन्यायाविरोधात ताकद दाखवा, आम्ही तुम्हाला सुखरूप घरी आणू असे आश्वासनही त्यांनी दिले. अन्याय होईल तिथे हिंदू समाज उभा राहिला पाहिजे आणि हिंदूंची मालवणी अशी ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे