‘त्यांचा अली, तर आमचा बजरंग बली’: आमदार नितेश राणे

Share

मुंबई : मालवणी मालाडमध्ये अतिक्रमण करण्याच्या नावाने बाहेरून लोक आणण्यात येत आहेत. माहीम येथून आलेल्या लोकांना इथे मतदार बनविण्यात आले आहे. मस्जिद, मदरशे बांधून हिंदूंना मुंबईबाहेर काढण्याचे षडयंत्र जिहाद्यांचे आहे. कोणी इथे मस्जिद उभारली, तर त्या बाजूला लगेच हनुमान मंदिर उभारा, असा सल्ला देत ‘त्यांचा ‘अली’ तर आमचा बजरंग बली’ अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी दिली.

अवैध गतीविधी व हिंदू हितासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मालाड मालवणी परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यामध्ये आमदार राणे बोलत होते. ते म्हणाले की, त्यांचे उरूस, मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही अटी नियम घालत नाहीत. हिंदू सणांच्या मिरवणुकांना पोलीस अटी घालतात. यांचे डीजे १२ वाजेपर्यंत चालतात. पण हिंदूना १० वाजता डीजे बंद करण्याची सक्ती पोलीस करतात. जेवढा मानसन्मान हिंदू पोलिसांना देतात, तेव्हा जिहादी देतात का, असा सवाल राणे यांनी केला.

लँड जिहादच्या नावाने मालवणीमध्ये अतिक्रमण सुरू आहे. टिपू सुलतानचे बोर्ड जिहादी लावत आहेत. हे लोक संविधान मानत नाहीत. त्यांना संविधान नको आहे, देशात शरिया कायदा लागू करण्याचा यांचा डाव असल्याचा आरोपही राणे यांनी केला. येथे रामनवमीच्या मिरवणुकीत चपला मारण्यात आल्या. म्हणून आता मोर्चात चालत असताना मी मस्जिदसमोर थांबलो, कुणी आज चप्पल भिरकावली असती तर मस्जिदमध्ये जाऊन तमाशा केला असता. ज्यांनी ज्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत चप्पल भिरकावली, त्यांचा हिशोब घेणार असा इशाराही आमदार राणे यांनी यावेळी दिला. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असल्याने त्यामुळे पोलिसांनी येथील हिंदूंच्या महिला, मुलींच्या संरक्षण करावे. अन्यथा पोलिसांना २४ तासांची सुट्टी देऊन मालवणीत भगवा फडकवून दाखवतो, असे आमदार राणे यावेळी म्हणाले.

मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील

मालवणीत एका एका घरात ३०-४० रोहिंगे, बांगलादेशी राहत आहेत. याची पोलिसांकडे कोणतीच आकडेवारी नाही. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही घरात घुसून त्यांचे हात-पाय काढून त्यांच्या देशात पाठवू. मस्जिद, मदरसे आणि अतिक्रमणे वाढवून मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. येथील अनधिकृत बांधकामांवर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा आमचा बुलडोझर चालवू असा इशाराही राणे यांनी प्रशासनाला दिला.

हा मोर्चा नव्हे संदेश

आज काढण्यात आलेला हा मोर्चा नव्हता, तर हिंदू एक असल्याचा संदेश असल्याचे राणे म्हणाले. यापुढे अन्यायाविरोधात ताकद दाखवा, आम्ही तुम्हाला सुखरूप घरी आणू असे आश्वासनही त्यांनी दिले. अन्याय होईल तिथे हिंदू समाज उभा राहिला पाहिजे आणि हिंदूंची मालवणी अशी ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही राणे म्हणाले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

9 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

9 hours ago