मुंबई: मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या(ranji trophy 2023-24) फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने तब्बल ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने सेमीफायनलमध्ये तामिळनाडूला एक डाव आणि ७० धावांनी हरवले.
या रणजीच्या हंगामात मुंबईच्या रूपाने पहिला फायनालिस्ट मिळाला आहे. मुंबई ग्रुप स्टेजमध्ये ७ पैकी ५ सामने जिंकले. याशिवाय त्यांनी एक सामना गमावला आणि एक सामना अनिर्णीत ठरला.
रहाणेच्या नेतृत्वा मुंबईने बिहारला एक डाव आणि ५१ धावांनी हरवत स्पर्धेची शानदार सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ग्रुप स्टेजचा दुसरा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध १० विकेटनी जिंकला. यानंतर त्यांनी तिसऱ्या सामन्यात केरळला २३२ धावांनी हरवले. दरम्यान, त्यांना चौथ्या सामन्यात उत्तर प्रदेशकडून पराभव सहन करावा लागला होता.
पाचव्या सामन्यात त्यांनी बंगालला एक डाव आणि ४ धावांनी हरवले. त्यानंतर छत्तीसगडविरुद्ध खेळवलेला सहावा सामना अनिर्णीत राहिला. यानंतर मुंबईने ग्रुपमधील सातवा आणि शेवटचा सामना आसामविरुद्ध एक डाव आणि ८० धावांनी जिंकला.
क्वार्टरफायनलमध्ये त्यांनी बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला. मात्र पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या मुंबईने सेमीफायनलसाठी क्वालिफाय आहे. यानंतर सेमीफायनलमध्ये त्यांनी तामिळनाडूला सेमीफायनलमध्ये हरवते फायनलचे तिकीट मिळवले.
याआधी रणजी ट्रॉफी २०२२-२३च्या हंगामात सौराष्ट्र संघाने बाजी मारली होती. जयदेव उनादकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रने मनोज तिवारीच्या नेतृत्वातील बंगालच्या संघाला ९ विकेटनी हरवले होते.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…