Ranji Trophy 2023-24:मुंबईने ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये मिळवले स्थान, सेमीफायनलमध्ये तामिळनाडूवर मात

मुंबई: मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या(ranji trophy 2023-24) फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने तब्बल ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने सेमीफायनलमध्ये तामिळनाडूला एक डाव आणि ७० धावांनी हरवले.


या रणजीच्या हंगामात मुंबईच्या रूपाने पहिला फायनालिस्ट मिळाला आहे. मुंबई ग्रुप स्टेजमध्ये ७ पैकी ५ सामने जिंकले. याशिवाय त्यांनी एक सामना गमावला आणि एक सामना अनिर्णीत ठरला.


रहाणेच्या नेतृत्वा मुंबईने बिहारला एक डाव आणि ५१ धावांनी हरवत स्पर्धेची शानदार सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ग्रुप स्टेजचा दुसरा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध १० विकेटनी जिंकला. यानंतर त्यांनी तिसऱ्या सामन्यात केरळला २३२ धावांनी हरवले. दरम्यान, त्यांना चौथ्या सामन्यात उत्तर प्रदेशकडून पराभव सहन करावा लागला होता.


पाचव्या सामन्यात त्यांनी बंगालला एक डाव आणि ४ धावांनी हरवले. त्यानंतर छत्तीसगडविरुद्ध खेळवलेला सहावा सामना अनिर्णीत राहिला. यानंतर मुंबईने ग्रुपमधील सातवा आणि शेवटचा सामना आसामविरुद्ध एक डाव आणि ८० धावांनी जिंकला.


क्वार्टरफायनलमध्ये त्यांनी बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला. मात्र पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या मुंबईने सेमीफायनलसाठी क्वालिफाय आहे. यानंतर सेमीफायनलमध्ये त्यांनी तामिळनाडूला सेमीफायनलमध्ये हरवते फायनलचे तिकीट मिळवले.



गेल्या हंगामात सौराष्ट्रने मारली होती बाजी


याआधी रणजी ट्रॉफी २०२२-२३च्या हंगामात सौराष्ट्र संघाने बाजी मारली होती. जयदेव उनादकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रने मनोज तिवारीच्या नेतृत्वातील बंगालच्या संघाला ९ विकेटनी हरवले होते.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना