S. Somnath ISRO : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान

Share

आदित्य एल-१ लाँचिंगच्या दिवशीच समजली होती बातमी; केला मोठा खुलासा…

चेन्नई : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan-3) तसेच भारताची सौर मोहिम ‘आदित्य एल-१’ (Aditya-L1) यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेले इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांना कॅन्सरचे (Cancer) निदान झाल्याची बातमी समोर आली आहे. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. शिवाय आदित्य एल-१च्या लाँचिंग दिवशीच मला या आजाराबाबत कळलं, असं त्यांनी सांगितलं. चांद्रयान -३ मोहिमेपासून त्यांना आरोग्यविषयक समस्या सुरु झाल्या होत्या. मात्र, तेव्हा आपल्याला कर्करोग झालाय, याची त्यांना माहिती नव्हती, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं.

सोमनाथ यांना कॅन्सर झाला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधील त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. चांद्रयान मोहिनंतर त्यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. तेव्हा त्यांना पोटाचा कॅन्सर झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले. त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर एस. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यावर किमोथेरपी सुरु आहे. स्कॅन, मेडिकल चेकअप्स अशा अनेक कठीण प्रक्रियांमधून गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. त्यांचा आजार आता बरा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली असल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

एस. सोमनाथ म्हणाले, ‘मला माहिती आहे की, कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. मात्र, ही लढाई मी लढेन आणि जिंकेन सुद्धा’ असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. ‘सध्या मी बराच रिकव्हर झालो आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर मी माझे काम देखील पूर्ण केले. अजूनही मी सातत्याने सर्व चेकअप करतोय. पण त्यासोबतच माझं काम आणि इस्रोचे मिशन यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

मुंबई मेट्रोला ४,६५७ कोटी निधी मिळणार!

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…

8 mins ago

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…

1 hour ago

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य, १५व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…

2 hours ago

Watch: फुलांच्या माळा आणि ओपन जीप, असे झाले अर्शदीपचे पंजाबमध्ये स्वागत

मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…

3 hours ago

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

7 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

7 hours ago