Gautam Gambhir : मला राजकीय कर्तव्यापासून मुक्त करा; जेणेकरुन...

गौतम गंभीरची जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी


नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून आता २०२४ ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तशी विनंती त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.


गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माननीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विनंती केली आहे की, मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!, असं म्हणत त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.


गौतम गंभीर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर दमदार विजय मिळाला होता. तर क्रिकेटमध्ये त्यांनी भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गौतम गंभीर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचे भाग होते. याशिवाय ते २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीमचेही एक भाग होते. ते सध्या पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती